कश्मीर पहलगाम हल्ला व स्टॉक क्रॅश?
कश्मीर पहलगाम हल्ला, जे काही झालं ते सारं भयानक होतं. कश्मीर स्वर्ग म्हणून ओळखलं जातं पण आता या क्रूर संताप देणार्य कृत्यामुळे कश्मीर मध्ये प्रवेश करणे
म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असे आहे. स्टॉक मार्केट सुद्धा या प्रसंगाने थोडा काय पूर्णच हादरला, काल पर्यंत हिरवा सिग्नल देणारे स्टॉक indices, म्हणजेच nifty 50, bank nifty आणि इतर
मार्केट उघडताच १ तासात लाल कंदील पेटवला. अर्थात मार्केट मध्ये उथळ होण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी सुरू ठेवलेले टॅरिफ वॉर, ज्यामध्ये त्यांचा थेट
निशाणा चायना वर जाऊन पोहोचला, चायना म्हणजे उद्योजकांचा मुख्य बाजार म्हणून ओळखला जाणारा देश, आणि जर मुळात बाजारच कोळंबला तर मग व्यवहार आणि इतर कामे सुद्धा पूर्ण कशी होणार हा प्रश्न?
प्रधानमंत्री यांनी घेतला मोठा निर्णय?
सिंधू पाणी करार. १९६० ह्या साली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एक करार झाला. ज्या करारामध्ये ६ नद्यांचे पाणी वाटप करण्याची घोषणा झाली.
या मध्ये भारताला रवी, बियास, व सतलज या नद्यांचा अधिकार मिळाला व पाकिस्तान ने सिंधू , झेलम व चिनाब या नद्यांचे पाणी चाखले, पण आता त्यांचा घसा कोरडा पडणार असे चित्र उभे दिसतं आहे.
पाकिस्तान या देशाचा संपूर्ण भार शेती वर अवलंबून आहे, आता जर भारताने प्रवाह रोखला तर मग त्यांची जमीन कोरडी पडेल, केलेल्या कृत्याची मजेशीर शिक्षा पाकिस्तान उपभोगणार.
Sensex ने सुद्धा रक्त सांधले.
काल सेंसेक्स मोठ्या संकेने ऊंची गाठत होता, ८०, ००० चा मुख्य टप्पा या मित्राने पार केला होता, पण आज तो सुद्धा या कृत्याने दुखी झालेला दिसतोय, ८०,००० वर resistance घेऊन तो पुन्हा आपली खाली जाण्याची तयारी करतोय की काय असा प्रश्न गुंतवणूक दारांना पडलेला दिसत असला, तरी घाबरायचे काही कारण नाही, अजून त्याने ७५५०० चा सपोर्ट ब्रेक नाही केला आहे, आज जर तो त्या सपोर्ट वर थांब राहिला तर कदाचित उद्या तो मोठी ऊंची मारायला तयार असेल.
Sensex: 79850/ ७९८५०
Bank Nifty: 55354/ ५५३५४
Nifty ५०: 24259/२४२५९
लेखक – आशिष दिपक पेडणेकर